आज नेहमीप्रमाणे सकाळी फिरायला गेले. आज उशीरच झाला तसा,साधारण ८ ची वेळ असेल. मस्त वातावरण होत. छान वारा सुटला होता,आभाळ भरून यायला लागल होत. आमराई जवळ आली तसं अजून छान वाटू लागल....पक्ष्यांचे आवाज....पाऊस येणार म्हणून चाललेली धावपळ ... फुलपाखरांच्या इकडून तिकडे गिरक्या ...सगळ काही छान चालू होत.
पण एक मजेदार गोष्ट म्हणजे, चार आजोबांचा एक ग्रुप jogging नंतर मस्तपैकी आमराइतले आंबे पाडण्यात गुंग होता :) पाडण्यात म्हणंजे दगड किंवा काठीने आंबे पाडण्यात नव्हे ....पण सगळे आजोबा वारा यायची वाट बघत . मग वाऱ्याने एखादा आंबा पडला कि तो पिशवीत घालत. हातातल्या चाकूने आंबा कापून खाता-खाता एखाद्या विनोदावर सगळे खळखळून हसत.
असा कितीतरी वेळ त्यांचा दंगा चालू होता. मला खूप energy आली त्यांच्याकडे बघून. किती enthusiastically त्यांचा तो खेळ चालू होता ! मला लहानपणीचे दिवस आठवले . आणि दोन मिनिटे असंही वाटल की कित्ती भरभरून जगतात हे ! आपण बऱ्याचदा मनात आलेल्या गोष्टी करायच्या टाळतो ....आपल्यासाठी so called 'वय ,status ,वेळ ,लोक काय म्हणतील ' अशा बऱ्याच गोष्टींची भीती असते. पण जर अशा थोड्या गोष्टी ज्या आपण करू शकतो ( आणि ज्याने कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही ) त्या केल्या तर त्या छोट्या गोष्टी कदाचित खूप आनंद देवून जातील . नाहीतरी कुणीतरी म्हटलंच आहे, "Enjoy the little things ...for one day when you look back , you will realize they were big things !"