" तुला love marriage करावस का वाटल ग ? " या प्रश्नांवर एका मैत्रिणीने दिलेले उत्तर कवितेत मांडायचा प्रयत्न

ठरवून केल जात नाही
ओढ असते दोन जीवांची
मन उगीचच गुंतत नाही
सहज येत ते आयुष्यात
निमंत्रण दिल जात नाही
आयुष्यच बदलून जात मग
आपल्या हातात काही राहत नाही...
गुंतले जरी धागे मनाचे
तरी प्रेमाचा अर्थ सापडेलच असे नाही
एकमेकांना समजून घेताना
सगळ्या गोष्टी पटतीलच असे नाही
तडजोड आणि खडतर वाट
आयुष्यात कुणाला चुकत नाही
पण बाकी कशाचीच फिकर नसते
जोपर्यंत हातातला हात सुटत नाही
आपला आनंद आणि आपले सुख
म्हणजे एक कोडे आहे...
प्रेम म्हणजे फक्त 'अनुभव'
सांगेल तेवढे थोडे आहे...!

No comments:
Post a Comment