Pages

Saturday, 31 August 2013

कुणीतरी

'त्या वयात ' प्रत्येक मुलीच्या मनात खूप काही साठलेलं असत ...मोरपंखी वय आणि स्वप्नाळू जग 'कुणाचीतरी' वाट पाहत असत ....अशा  मुलीला असणाऱ्या अपेक्षा या कवितेत मांडायचा एक प्रयत्न


       














भावनांना किंमत देणार हवं कुणीतरी
शब्दांना समजून घेणार हवं कुणीतरी
जेव्हा वाटेल 'आता संपलंय सगळ '
'चल नवी सुरुवात करू ' म्हणणार हवं कुणीतरी

हातात हात घेणार  हवं कुणीतरी
आयुष्याच्या अंतापर्यंत तो धरणार हवं कुणीतरी
जेव्हा वाटेल आता 'होणार कसं आता आपलं पुढ?'
'हात सोडू नकोस, मी करेन सगळ ' म्हणणार हवं कुणीतरी

मनाने नेहमी  जवळ असणार हवं कुणीतरी
न बोलता अंतरंग जपणार हवं कुणीतरी
जेव्हा वाटेल आता एकटी पडले आहे मी
'मी आहे ग नेहमीच सोबत' असा धीर देणार हवं कुणीतरी...

संसारातली धावपळ तर रोजचीच असते पण
माझ्यासाठी वेळ  राखून ठेवणार हवं कुणीतरी
आणि जर गरज पडलीच कधी तर,
तीच वेळ थांबवाची ताकद असणार हवं कुणीतरी....!







No comments:

Post a Comment