Pages

Wednesday, 26 June 2013

दिवस माझ्या मैत्रीचे


 (  शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले न विसरणारे दिवस असतात.
दंगा, मस्ती, खोड्या, शिक्षा आणि बरेच काही जगलेले दिवस....
या सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो मित्रांचा किंवा मैत्रिणींचा....!!
१० वी चा send off म्हणजे शालेय जीवनाचा अंतिम टप्पा.
ही कविता मी माझ्या १० वी च्या send off ला केली होती. अशीच एक आठवण ....)








माझ्या आयुष्याच्या वाटेवर
अनेक वेगवेगळी वळणे आली,
शालेय जीवनातील मैत्री
ही त्यातलीच एक सुंदर वाट झाली


या वाटेवर मी बागडले
रमले भान विसरून
मैत्रिणींच्या सुख-दुख्खात
एकमेकीना सोबत देवून





 मैत्री म्हणजे असते काय
हे पहिले जर मागे वळून
तर असे आठवतात ते सोनेरी दिवस
येतात डोळे भरून.....

दुसऱ्यासाठी जगायचे असते
हे मैत्रीनेच शिकवले
एकमेकींच्या आयुष्यातले
अनेक क्षण आम्ही वाटले





कधी रडलो, कधी हसलो
कधी स्वतःचे अस्तित्व हरवलो
आज मात्र निरोप देताना
सर्वजणी तितक्याच गहीवरलो

आज आम्ही त्या सुंदर वाटेला
निरोप देतो आहोत
एका सुंदर आयुष्याची
दारे बंद करतो आहोत






आजपासून मी पुन्हा तुमच्या
सहवासात असणार नाही
पण दिवस स्मरले मंतरलेल्या मैत्रीचे
तर आठवल्याशिवाय राहणार नाही.....!!!



 

Monday, 24 June 2013

स्वप्नांचे मृगजळ






मला सांगाल का स्वप्नांची
नेमकी सुरुवात होते कुठून?
लहान असल्यापासून की
समजायला लागल्यापासून?

जागेपणी पडणाऱ्या स्वप्नांची
लहानपणीच मनात कधीतरी सुरुवात होते
'मोठेपणी मी असा असणार'
हे प्रत्येकाने ठरवून ठेवलेले असते

ती स्वप्ने पूर्ण करायला मग
प्रत्येकजण धाव धाव धावतो
बरेच कष्ट घेतो आणि
बऱ्याच गोष्टी हरवून बसतो

एवढे सारे करून जर
ती स्वप्ने दूर पळत असतील
तर वाटते का बर मी
इतकी वर्षे हरवली असतील?

कधी कधी वाटते स्वतःकडून
आपणच खूप अपेक्षा ठेवल्या
त्या माझ्या नशिबात न्हवत्या
म्हणूनच पूर्ण नाही झाल्या....:(

शेवटी अशी एक वेळ येते
वाटते पाठशिवणीचा खेळ आहे सारा
कशासाठी बरे मांडून ठेवला
माझा मीच हा इतका पसारा?

स्वप्ने पाहणे म्हणजे उमजते
कि ते आहे केवळ 'मृगजळ'
कितीही जवळ पोचलो तरी
ते म्हणते "पळ पळ".....!




 

Saturday, 8 June 2013

पाऊस....

पाऊस आणतो बेभान  वारा
पाऊस आणतो कोसळणाऱ्या धारा
पाऊस चिंब ओल्या मनाचा थाट
पाऊस म्हणजे विजांचा कडकडाट









पाऊस येतो घेवून हिरवे रान
पाऊस होतो पक्षांची तान
पाऊस म्हणजे ओला सुवास मातीचा
पाऊस म्हणजे कायापालट निसर्गाचा..!





पाऊस  लहानांसाठी होडी होतो
पाऊस  तरुण मनाची गोडी होतो
असा हा पाऊस तन -मनाला डोलवतो,
असा हा पाऊस सर्वांनाच वेड लावतो...!











पाऊस होतो  शेतकऱ्याला संजीवनी
पाऊस आणतो  फुला-झाडांना पालवी
पाऊस झाडतो मनाची मरगळ
पावूस देवून जातो आनंद निरंतर...!