( शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातले न विसरणारे दिवस असतात.
दंगा, मस्ती, खोड्या, शिक्षा आणि बरेच काही जगलेले दिवस....
या सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो मित्रांचा किंवा मैत्रिणींचा....!!
१० वी चा send off म्हणजे शालेय जीवनाचा अंतिम टप्पा.
ही कविता मी माझ्या १० वी च्या send off ला केली होती. अशीच एक आठवण ....)

माझ्या आयुष्याच्या वाटेवर
अनेक वेगवेगळी वळणे आली,
शालेय जीवनातील मैत्री
ही त्यातलीच एक सुंदर वाट झाली
या वाटेवर मी बागडले
रमले भान विसरून
मैत्रिणींच्या सुख-दुख्खात
एकमेकीना सोबत देवून
मैत्री म्हणजे असते काय
हे पहिले जर मागे वळून
तर असे आठवतात ते सोनेरी दिवस
येतात डोळे भरून.....
दुसऱ्यासाठी जगायचे असते
हे मैत्रीनेच शिकवले
एकमेकींच्या आयुष्यातले
अनेक क्षण आम्ही वाटले

कधी रडलो, कधी हसलो
कधी स्वतःचे अस्तित्व हरवलो
आज मात्र निरोप देताना
सर्वजणी तितक्याच गहीवरलो
आज आम्ही त्या सुंदर वाटेला
निरोप देतो आहोत
एका सुंदर आयुष्याची
दारे बंद करतो आहोत
आजपासून मी पुन्हा तुमच्या
सहवासात असणार नाही
पण दिवस स्मरले मंतरलेल्या मैत्रीचे
तर आठवल्याशिवाय राहणार नाही.....!!!


No comments:
Post a Comment